ये दीवार गिरती ही नही..

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाजारीकरण नुकतेच सुरू होऊन कसोटी क्रिकेटची जादू कमी होण्याचा आणि एकदिवसीय सामन्यांचे पर्यायाने झटपट क्रिकेटचे प्रस्थ वाढण्याचा काळ होता. अशा काळात राहुल ्रविडचे भारतीय संघात पदार्पण झाले. इंग्लंडविरुद्ध परवा लॉर्डसवरील कसोटीत शतक झळकावून ्रविडने भारतीय संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली आणि लॉर्डसवर शतक झळकावण्याचे आपले स्वप्न साकार केले. त्याच लॉर्डसवर पंधरा वर्षापूर्वी कसोटी पदार्पण करणाऱ्या ्रविडला अवघ्या पाच धावांनी शतकाने हुलकावणी दिली होती. ्रविडच्या बाबतीत एक गोष्ट सातत्याने जाणवते, ती म्हणजे क्रिकेटमध्ये हिमालयाएवढी कामगिरी करूनही राहुल ्रविड नावाच्या खेळाडूचे कर्तृत्व तेंडुलकरच्या सावलीत झाकोळले गेले. त्याच्या वाटय़ाला फारसे कौतुक कधीच आले नाही. परीकथेत नावडत्या राणीचा राजपुत्र जसा उपेक्षित असतो आणि आपल्या चांगुलपणाने सगळ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो, तसाच राहुल ्रविड पंधरा वर्षे भारतीय संघासाठी जीव तोडून खेळत राहिला. एकेकाळी सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळातील सभ्यतेचा ऱ्हास झाल्याच्या काळात स्वत:च्या वर्तनाने नव्या पिढीपुढे एक वेगळा आदर्श घालून देत आहे. त्याबाबतीत त्याची तुलना करायचीच तर त्याचा गाववाला अनिल कुंबळेशी करता येते.
सचिन तेंडुलकर, वीरें्र सेहवाग, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे ्रविडसोबत पुढे-मागे खेळलेले भारताचे श्रेष्ठ फलंदाज आहेत. सचिन, सेहवाग, गांगुलीच्या बॅटमधून सीमापार जाणारे चेंडू पाहणे हा जसा आनंद असतो त्याचप्रमाणे लक्ष्मणच्या मनगटाची जादू पाहणे हाही एक वेगळाच आनंद असतो. ्रविडकडे यापैकी काही गोष्टींची कमतरता असली तरी कठोर परिश्रम, एकाग्रता, आणि जिद्दीच्या बळावर तो आज वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षीही भारतीय संघाचा आधारस्तंभ म्हणून खंबीरपणे उभा आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ गेल्यापासून सगळ्या प्रसारमाध्यमांनी सचिनच्या शंभराव्या शतकासाठी देव पाण्यात घालून ठेवले होते. दुर्दैवाने दोन्ही कसोटींमध्ये तो योग आला नाही. ते शतक झाले असते तर देशात पुन्हा एकदा दिवाळी झाली असती. मोजक्या धावा करून सचिन पॅव्हेलियनमध्ये परतत असताना ्रविडने लागोपाठ दोन शतके ठोकली, त्यांची अगदी माफक दखल सगळ्यांनी घेतली. यातील टेंटब्रिजचे शतक तर गावसकरच्या शतकांची बरोबरी करणारे होते. आज सचिन तेंडुलकर सर्वात पुढे असला तरी गावसकर हे भारतीय क्रिकेटमधील शिखर मानले जाते, ्रविडने धावांच्या संख्येच्याबाबतीत गावसकरना कधीच मागे टाकलेय, परंतु त्यांच्या शतकांची बरोबरी केल्यानंतरही ्रविडच्या वाटय़ाला माफक कौतुकच आले. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. ्रविडच्या बाबतीत असे वारंवार घडत आलेले दिसते.
कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा पार करणे ही साधीसुधी गोष्ट नाही. कठोर परिश्रमाबरोबरच सातत्याशिवाय साध्य होणारी ही गोष्ट नाही. ्रविडने दोन हजार सातमध्ये चेन्नईच्या चिदंबरम स्टेयिमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दहा हजार धावांचा टप्पा पार केला. दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा तो सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यानंतरचा भारताचा तिसरा फलंदाज होता. त्याच्याशिवाय अ‍ॅलन बोर्डर, स्टीव्ह वॉ आणि ब्रायन लारा हे जगातील दहा हजारी खेळाडू होते. दहा हजारी क्लबमधील तो जगातला सहावा खेळाडू होता, त्याचीही त्यावेळी फारशी दखल त्यावेळी घेतली गेली नाही, कारण त्याच कसोटीत वीरें्र सेहवागने धुव्वाधार त्रिशतकी खेळी केली होती. सेहवागच्या त्रिशतकाच्या धडाक्यात ्रविडच्या दहा हजार धावा झाकोळून गेल्या. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर विश्लेषण करणारा अजय जडेजा म्हणाला होता की,’सेहवागच्या त्रिशतकापेक्षा ्रविडची कामगिरी अधिक मोलाची आहे, कारण एक मोठी खेळी कुणीही करू शकतो, परंतु दहा हजार धावा करण्यासाठी सातत्याची गरज असते.’
कोणत्याही खेळाडूच्या मूल्यमापनासाठी त्याच्या आकडेवारीशिवाय दुसरे काहीही महत्त्वाचे नसते. त्यादृष्टीने एकशे पंचावन्न कसोटींमध्ये त्रेपन्नच्या सरासरीने साडेबारा हजार धावा काढणारा राहुल ्रविड हा सचिन तेंडुलकरनंतरचा मोठा फलंदाज आहे. परंतु त्याच्या कौतुकासाठी ‘द वॉल’ यापलीकडे कुणी वेगळे कौतुकाचे विशेषण वापरल्याचे आढळत नाही. भारतीय संघाची भिंत म्हणून तो पंधरा वर्षे उभा आहे आणि एका जाहिरातीतल्याप्रमाणे ‘ये दीवार गिरतीही नही..’असे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना अनेकदा म्हणावे लागले आहे. राहुल ्रविड हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक भरवशाचा फलंदाज आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ति ठरणार नाही. हा भरोसा त्याने आपल्या कर्तृत्वातून निर्माण केला आहे. टेंटब्रिज कसोटीत दुसऱ्या डावात सुरुवातीच्या टप्प्यातच ही भिंत कोसळली, तेव्हाच लक्षात आले की, आता भारताचे काही खरे नाही. कारण त्या परिस्थितीत मैदानावर उभे राहण्याची क्षमता असलेले फक्त ्रविड आणि लक्ष्मण हे दोघेच होते. दुर्दैवाने दोघेही टिकले नाहीत आणि पुढचे आव्हान सचिन तेंडुलकरच्या आवाक्यातले नव्हते.
्रविडला पहिल्यांदा कसोटी संधी मिळाली ती संजय मांजरेकर जखमी झाल्यामुळे. ्रविड आणि गांगुली भारतीय संघात आल्यामुळे मांजरेकरचे स्थान डळमळीत झाले होते. खरेतर झटपट क्रिकेटचे प्रस्थ वाढत असताना मांजरेकरसारखा तंत्रशुद्ध फलंदाज कालबाह्य ठरत होता. त्याचे स्थानही डळमळीत झाले होते, त्या परिस्थितीत मांजरेकर जिद्दीने उभा राहिला नाही, त्याची जिद्द कमी पडली आणि त्याने निवृत्तीचा मार्ग पत्करला. मांजरेकरच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटच्या घरंदाजपणावर प्रेम करणाऱ्यांना काळजी वाटत होती, ती राहुल ्रविडची. कारण या बाजारू जमान्याचा पुढचा बळी ्रविडच ठरण्याची भीती वाटत होती. परंतु हा पठ्ठय़ा त्याला परिस्थितीवर स्वार झाला. कसोटीसह एकदिवसीय संघातही त्याने आपली जागा निश्चित केली. तरीही अनेकांना ्रविड हा एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य खेळाडू वाटत नाही. अशांच्या माहितीसाठी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे एकदिवसीय सामन्यांमध्ये सौरभ गांगुलीबरोबर तीनशे अठरा आणि सचिन तेंडुलकरसोबत तीनशे एकतीस अशा दोन मोठय़ा भागीदाऱ्या ्रविडच्या नावावर आहेत. बारा शतके आणि ब्याऐंशी अर्धशतकांसह सुमारे चाळिसच्या सरासरीने दहा हजारावर धावा कुटल्या आहेत. एकदिवशीय सामन्यातील जलद अर्धशतकही त्याच्या नावावर आहे. कसोटी, एकदिवशीय सामन्यांबरोबरच आयपीएलमध्येही त्याने उत्तम कामगिरी बजावलीय. काहीवेळा खराब कामगिरीनंतर त्याला वगळण्याची मागणी होऊ लागली. दोन हजार सातमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर एकदिवसीय संघातून वगळले. त्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईविरोधात दोनशे अठरा धावा काढून त्याने आपले नाणे अजून खणखणीत असल्याचे दाखवून दिले.
परवा चौतिसावे शतक केल्यानंतर विक्रमादित्य सुनील गावसकरने त्याच्याबद्दल काढलेले उद्गार कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे आहेत. गावसकर म्हणाले, ‘्रविड जेव्हा फलंदाजी करीत असतो, तेव्हा त्याच्या हातात बॅट नव्हे तर भारताचा तिरंगा असल्यासारखे वाटते. आजच्या क्रिकेटपटूंसाठी ्रविडसारखे हे खरेखुरे रोल मॉडेल आहे.’

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर