पोस्ट्स

एप्रिल, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’

अखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दावा करणाऱ्याच्याबाबतीतही मृत्यू हेच अंतिम सत्य असल्याचे सिद्ध झाले. मार्चपासून त्यांच्याच ट्रस्टने उभारलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याआधी अनेक दिवस ते आजारी होते, परंतु त्यांच्याच चेल्यांनी या भगवानाला साक्षात कैदेत ठेवल्यासारखे ठेवले होते. त्यांच्यावर काय उपचार सुरू होते किंवा उपचार सुरू होते की नव्हते याचीही कुणाला कल्पना नव्हती. एका भक्ताने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर सत्यसाईबाबांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. लवकरच महाराज आश्रमात परत येणार असून भक्तांना दर्शन देणार आहेत, अशा वावडय़ा त्यांचे चेले उठवत होते, तेव्हा स्वत:ला साक्षात भगवान म्हणवून घेणारे सत्यसाईबाबा मृत्यूशी झुंज देत होते. ही झुंज अपयशी ठरली आणि रविवारी एप्रिलला रुग्णालयाच्या बंद खोलीत त्यांचे देहावसान झाले. चमत्कार होईल आणि बाबा रुग्णालयातून परत येतील, असे त्यांच्या भक्तांना वाटत होते. कारण स्वत: बाबांनीच आपण वर्षे जगणार

बाबासाहेबांचे बोट सोडून चाललेले अनुयायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अद्याप सार्वजनिक उत्सवाचे स्वरुप आलेले नाही. समाजातील सर्व घटकांनी आंबेडकर जयंती साजरी केली असे सगळीकडे दिसत नाही. अलीकडच्या काळात ग्रामीण भागात ग्रामस्वच्छता अभियानापासून तंटामुक्ती मोहिमेर्पयत अनेक योजना राबवण्यात येऊ लागल्या. सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ लागले. त्यातूनच काही गावांमध्ये सर्व जाती-धर्माचे उत्सव गावाने एकत्रितपणे साजरे करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु अशी गावे फारच थोडी आहेत. बाकी सगळीकडे आंबेडकर जयंती हा दलितांचा त्यातही पुन्हा नवबौद्धांचा उत्सव एवढय़ापुरताच मर्यादित राहिला आहे. पुरोगामी म्हणून ढोल वाजवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीतून आपल्याला बाहेर काढता आलेले नाही. जयंतीच्या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात. जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांच्या कार्याची उजळणी करून त्यांच्या पावलांवरून चालण्याचा खोटा खोटा निर्धार करायचे सोडून अनाठायी प्रश्न उपस्थित करणे औचित्यभंग करणारे आहे, असे कुणी म्हणू शकेल. परंतु कधीतरी या प्रश्नांची चर्चा होण्याची गरज आहे आणि ती ज

मूर्ख म्हातारा पुन्हा डोंगराला भिडला

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला धडक दिली आहे. पतसंस्थांमधील भ्रष्टाचार, धान्यापासून दारुनिर्मिती किंवा तत्सम विषय घेऊन राळेगणसिद्धी ते मुंबई असे हेलपाटे मारणाऱ्या अण्णा हजारे नावाच्या रिकामटेकडय़ा माणसाच्या संयमाची परीक्षा महाराष्ट्र सरकारने अनेकदा पाहिली. अण्णांच्याबरोबर अनेक वेळा मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या. त्यांना तोंडभर आश्वासने दिली. अण्णांनी राळेगणसिद्धीला अनेकदा उपोषणाचा निर्णय जाहीर केला. सरकारने आपली खास माणसे पाठवून अण्णांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. हेकेखोर मानल्या जाणाऱ्या या म्हाताऱ्याने प्रत्येकवेळी सरकारवर, सरकारच्या प्रतिनिधींवर विश्वास ठेवून आंदोलने स्थगित केली. तात्पुरत्या संकटातून सरकारची सुटका होत राहिली. परंतु दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकारने कधीच ठोस पावले उचलली नाहीत. राज्यातील पतसंस्थांमध्ये सामान्य माणसांचे कोटय़वधी रुपये अडकून आहेत. आयुष्यभर जमा केलेली पूंजी अडकल्यामुळे अनेक सधन लोक अक्षरश: रस्त्यावर आले. सामान्य ठेवीदारांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. परंतु सहकाराला संरक्षण देणाऱ्या सरक