पोस्ट्स

जुलै, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव

इमेज
 पंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे लिहित होतो ती कविता होती किंवा नाही हेही समजत नव्हतं. कोल्हापूरला कॉलेजला होतो. एप्रिल महिना असावा. सूर्य आग ओकत होता. रस्त्यावरचं डांबरही वितळून त्याचे छोटे छोटे बुडबुडे येत होते. पावलांचे ठसे त्यावर ठसठशीतपणे उमटत होते. केशवराव भोसले नाटय़गृहाजवळ देवल क्लबच्या जुन्या इमारतीसमोर रस्त्यावर एक मळकट कागद पडला होता. कुतूहल म्हणून तो उचलला तर त्यावर ‘ गाव ’ नावाची कविता होती - आभाळ जिथे घन गर्जे/ते गांव मनाशी निजले /अंधार भिजे धारांनी/घर एक शिवेवर पडले.. अन् पाणवठय़ाच्या पाशी/खचलेला एकट वाडा/मोकाट कुणाचा तेथे/कधिं हिंडत असतो घोडा.. झाडांतून दाट वडाच्या/कावळा कधीतरि उडतो/पारावर पडला साधू/ हलकेच कुशीवर वळतो.. गावांतिल लोक शहाणे/कौलांवर जीव पसरती/पाऊस परतण्याआधी/क्षितिजेंच धुळीने मळती.. - तसल्या उन्हात रस्त्याच्या मधोमध उभ्याउभ्याच कविता वाचून संपवली , तेव्हा पाय उचलता येईना. पाहिलं तर रस्त्यावरच्या डांबरात पायातलं स्लीपर रुतून बसलं होतं. ते तुटणार

संमेलनाची वाटचाल साहित्याकडून अर्थकारणाकडे

 चिपळूण येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन् होत आहे.   संमेलन चिपळूणमध्ये होणार हे , निश्चित झाल्यापासून अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवारांनी जो वाद सुरू केला आहे , तो मराठी साहित्य जगताला नवा नाही. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने होणारे वैचारिक वाद मागे पडून असल्या फालतू गोष्टींना अलीकडे महत्त्व येऊ लागले आहे आणि ते एकूण आजच्या वाड्.मयीन संस्कृतीशी आणि सारस्वतांच्या वैचारिक वकुबाशी सुसंगत असेच आहे. महामंडळाच्या घटक संस्थेचा सदस्य असलेल्या कुणालाही अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येत असल्यामुळे हजार-पाचशेच्या पावतीचा सदस्य असलेल्या कुणी अक्षरशत्रूही अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. अध्यक्षपदासाठी मोठे साहित्यिक योगदान किंवा समज वगैरेची गरज नसते. प्रचार करून , दोघा-तिघांना चितपट करून अध्यक्षपद मिळवणाऱ्यांनी फार मोठे वैचारिक दिवे लावले आहेत , असेही अलीकडच्या काळात दिसलेले नाही. गतवर्षीच्या वसंत आबाजी डहाके यांच्या भाषणातील काही पानांचा अपवाद वगळता अलीकडच्या अध्यक्षांची भाषणे रद्दीत घालण्याच्या योग्यतेचीच आहेत. त्यात पुन्हा अध्यक्षपद लाभाचे बनल्यामुळे अनेक साहित्यिकांची हृदये त्यासाठी

येडियुरप्पांची मुजोरी

इमेज
 बूकानाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदावरून  जुलै  रोजी पायउतार झाले , त्याला अकरा महिने झाले. म्हणजे अजून वर्षसुद्धा पूर्ण झालेले नाही. एकीकडे भारतीय जनता पक्षाने कें्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रणशिंग फुंकले असताना अवैध खाणकाम प्रकरणी लोकायुक्तांच्या अहवालात येडियुरप्पा यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे पक्षाने त्यांचा राजीनामा मागितला. परंतु येडियुरप्पा हे एवढे घमेंडखोर की , त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला.  आमदारांसह  खासदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून त्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावले. साधनशुचिता आणि शिस्तीचा डांगोरा पिटणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचे प्रसंग भूतकाळात पाहिले असले तरी येडियुरप्पांचे प्रकरण जरा जास्तीच हाताबाहेर गेल्यासारखे होते. त्यात नितीन गडकरी यांना जुमानायचे नाही , असाच पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु त्यांचे सगळेच वर्तन संघाच्या आणि भाजपच्या शिस्तीच्या परंपरेला सुरुंग लावणारे असल्याने ते कोणत्याच नेत्याला आणि गटाला मानवणारे नव्हते. त्यामुळे मिळून