पोस्ट्स

जून, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सरकार निघाले राजवाडा खरेदी करायला

रामदास आठवले यांनी काँग्रेस आघाडीची साथ सोडून युतीची संगत धरल्यानंतर महाराष्ट्रात दलितांबद्दलच्या कळवळ्याला नुसते उधाण आले आहे. त्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाली. मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यासाठी शिवसेनेने विरोध केलाच नव्हता, उलट हा नामविस्तार आपणच सुचवला होता, असा दावा त्यांनी केला आणि खंडण-मंडणाची चढाओढ सुरू झाली. जुन्या घटनांना उजाळे दिले गेले, कुणाकुणाच्या साक्षी काढल्या गेल्या. तत्कालीन वृत्तपत्रीय पुरावे काढून खरे-खोटे करण्यात आले. रिडल्सच्या आठवणींना उजाळा मिळाला. परंतु एकदा रामदास आठवले आणि शिवसेनेने परस्परांना स्वीकारल्यानंतर बाकी सगळ्या चर्चा फिजूल ठरल्या. आठवले दूर गेल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपणच कसे दलितांचे तारणहार आहोत, याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून पक्षाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त केवळ दलित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांना कें्रस्थानी ठेवून सामाजिक परिवर्तन हक्क परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर काही दिवस आधी दादर रेल्वे स्थानकाचे चैत

शाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे

सव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’ महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मात्र आजही उपेक्षित आहेत. त्यांचे कार्य या तीन महापुरुषांच्या तोडीचे असूनही त्यांना या पंगतीत स्थान मिळालेले नाही. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाज

रामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव

योगगुरू रामदेवबाबा यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले. दिल्लीतील रामलीला मैदानावरून हनुमानउडी मारून पलायन केले, त्याचवेळी खरेतर त्यांचे उपोषण आणि सत्याग्रहाची ताकद संपली होती. परंतु दिल्लीत मुखभंग झाल्यानंतरही स्वत:च्या ताकदीविषयी फालतू भ्रम बाळगणाऱ्या रामदेवबाबांनी हरिद्वारमध्ये उपोषण सुरू ठेवले. ज्याला कें्रसरकारच्या लेखी काडीचीही किंमत नव्हती. रामलीला मैदानात बाबांच्या नैतिकतेचा फुगा फुटल्यामुळे प्रसारमाध्यमांनीही त्यांच्या या उपोषणाकडे फारसे लक्ष दिले नाही. उपोषणकाळात अखंड बडबड करीत राहिल्यामुळे नियोजित वेळेआधीच त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. प्रकृती खालावल्यामुळे श्रीश्री रविशंकर, मोरारी बापू वगैरे मंडळींनी आग्रह करून त्यांना उपोषण सोडायला लावले. देशातील जनतेला भ्रष्टाचाराविरोधात लढय़ासाठी सिद्ध करण्याच्या बढाया मारीत सुरू केलेल्या एका धंदेवाईक नाटकबाजाचे ढोंग उघडे पडले. राजहंस डौलदार चालतो म्हणून बदकाने तसा प्रयत्न केला तर त्याला राजहंसाचा डौल येऊ शकत नाही. रामदेवबाबाचेही तसेच झाले. अण्णा हजारे यांना भ्रष्टाचाराविरोधातील उपोषणामुळे मिळालेली प्रसिद्धी पाहून पोटात दुखू लागलेल्या राम

राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे

एक तपाची वाटचाल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या टप्प्यावर उभा आहे, याचा विचार केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे आले आहे. पक्षाध्यक्षपदी शरद पवार असले तरी गेल्या एक वर्षापासून पक्षासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय अजित पवार यांच्यामार्फत होत आहेत आणि प्रारंभी खळखळ करणाऱ्या पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे किंवा त्यांना जाहीर विरोध करण्याचे धाडस तरी अद्याप केलेले नाही. ही झाली पक्षांतर्गत बाब. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करताना आता प्राधान्याने अजित पवार यांनाच टार्गेट केले जात आहे, याचा अर्थ विरोधकांनीही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचे मान्य केले आहे. अशा रितीने अनेक पातळ्यांवर नेतृत्व प्रस्थापित होत असताना अजित पवार अधिकाधिक आक्रमक होऊ लागले आहेत. मूळचाच आक्रमक स्वभाव, परंतु नेतृत्व करताना त्याला प्रगल्भतेची जोड हवी, त्याचा अभाव जाणवल्यावाचून राहात नाही. अजित पवार यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे पक्षाला तरुण चेह