सरकार निघाले राजवाडा खरेदी करायला
रामदास आठवले यांनी काँग्रेस आघाडीची साथ सोडून युतीची संगत धरल्यानंतर महाराष्ट्रात दलितांबद्दलच्या कळवळ्याला नुसते उधाण आले आहे. त्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून झाली. मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यासाठी शिवसेनेने विरोध केलाच नव्हता, उलट हा नामविस्तार आपणच सुचवला होता, असा दावा त्यांनी केला आणि खंडण-मंडणाची चढाओढ सुरू झाली. जुन्या घटनांना उजाळे दिले गेले, कुणाकुणाच्या साक्षी काढल्या गेल्या. तत्कालीन वृत्तपत्रीय पुरावे काढून खरे-खोटे करण्यात आले. रिडल्सच्या आठवणींना उजाळा मिळाला. परंतु एकदा रामदास आठवले आणि शिवसेनेने परस्परांना स्वीकारल्यानंतर बाकी सगळ्या चर्चा फिजूल ठरल्या. आठवले दूर गेल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपणच कसे दलितांचे तारणहार आहोत, याचे ढोल वाजवायला सुरुवात केली. त्याचाच भाग म्हणून पक्षाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त केवळ दलित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांना कें्रस्थानी ठेवून सामाजिक परिवर्तन हक्क परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या पाश्र्वभूमीवर काही दिवस आधी दादर रेल्वे स्थानकाचे चैत...