पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठा समाजाची खदखद कशामुळे ?

इमेज
राज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणालाच येत नाही. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येणाऱ्या मराठा समाजाची ही प्रासंगिक खदखद आहे, काही साचत आलेल्या गोष्टी आहेत की यामध्ये भविष्यकालीन उलथापालथीची बीजं दडली आहेत, याबद्दलही कुणी ठोसपणे सांगू शकत नाही. एखाद्या सामाजिक घटनेसंदर्भात एवढी अनिश्चिततेची किंवा अंदाज बांधता न येण्याजोगी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. मराठा समाज मोर्चांच्या संघटनासाठी निमित्त ठरले ते कोपर्डी येथील घटनेचे. या घटनेनंतर दलित-सवर्ण संघर्षाला चिथावणी देण्याचे, सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न झाले. परंतु महाराष्ट्रात अपवाद म्हणूनही कुठे हिंसक प्रतिक्रिया उमटली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कोपर्डीच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राजकीय पातळीवरून करण्यात आली. राज ठाकरे यांनी ती पहिल्यांदा केली. शरद पवार यांनी त्यासंदर्भात खूप सावध प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येत असतील, तर त्यांच्या भावनांची दखल घ्यायला हवी, असे

मराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’

इमेज
रंगनाथ पठारे यांनी कथा आणि कादंबरीलेखनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ‘चोषक फलोद्यान’ ही त्यांची श्रीरामपूरच्या  शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली  नवी कादंबरी त्यांच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्याच नव्हे तर एकूण मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा ओलांडून पुढे जाणारी आहे. मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापासून स्वतःला अंतरावर ठेवले आहे. या विषयावर मराठीत झालेले बहुतांश लेखन सवंग, उथळ प्रकारांमध्ये मोडणारे आहे. माणसाच्या जगण्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या या विषयाला भिडण्याचे धारिष्ट्य मराठी लेखकांनी दाखवले नाही. भाऊ पाध्ये यांच्यासारखा सन्माननीय अपवाद. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकता, सामाजिक पर्यावरण आणि समाजात वावरतानाचे मानसिक दबाव किंवा   नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पनेबाबत आकलनाच्या मर्यादा अशी काही कारणे त्यामागे असू शकतील. या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांच्यासारखा गंभीर लेखक अशा विषयाला ताकदीने भिडताना मराठी कादंबरीविश्व समृद्ध करण्याबरोबरच वाचकांनाही घडवण्याचे काम करतो. ‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले संपूर्ण जीवन, आ

गुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा

गुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरात

कुंबळे नावाचा जादूगार !

इमेज
अनिल कुंबळेची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली, ही बातमी भारतीय क्रिकेटच्या कुणाही चाहत्याला आनंद देणारी आहे. कुंबळेसारख्या उमद्या खेळाडूकडं नवी जबाबदारी सोपवण्यात आली. सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या भारतीय संघातील कुंबळेच्या सहकाऱ्यांनीच ही निवड केलीय. संघासाठी प्रशिक्षक किती महत्त्वाचा असतो हे जाणतात, त्याचप्रमाणं कुंबळे किती उत्तम सहकारी, मित्र आणि मार्गदर्शक आहे, हेसुद्धा तिघं उत्तम रितीनं जाणतात. म्हणूनच तर अनेक दिग्गज नावं स्पर्धेत असताना त्यांनी कुंबळेची निवड केली. संघव्यवस्थापनाचा भाग म्हणून प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते, हे अनेकदा दिसून आलंय. ग्रेग चॅपेल प्रकरणात तर प्रशिक्षकाचं उपद्रवमूल्य काय असतं, हेही सगळ्यांनी अनुभवलंय. कुंबळेच्या निवडीला महत्त्व येतं ते त्यामुळंच. मार्गदर्शनाचा बडेजाव कुणीही करेल, पण कुंबळे नव्यातल्या नव्या खेळाडूचा मित्र बनू शकतो. त्यांना उभारी देऊ शकतो. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे, असं म्हटलं जायचं. परंतु तो भूतकाळ झाला. कसोटी, साठ षटकांची वन डे, पन्नास षटकांची वन डे, टी-२० असं क्रिकेटचं विश

राज ठाकरे उरले टीआरपीपुरते !

इमेज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रवास पाहिला तर त्यांची धाव सतत एका खड्ड्याकडून दुसऱ्या खड्ड्याकडे सुरू असल्याचे दिसते. आपल्याकडे पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी म्हण आहे. राज ठाकरे यांना ती लागू होत नाही, कारण ते स्वतःच नेहमी पुढे असतात. त्यामुळे नेहमी ठेचा त्यांनाच लागतात. शहाणा माणूस दुसऱ्याला ठेच लागली तरी शहाणा होतो, परंतु राज ठाकरे स्वतः ठेचा खाऊनही शहाणे होत नाहीत, असे दिसते. एक-दोन-चार वर्षे हे रांगण्याचे, दुडदुडण्याचे, धडपडण्याचे वय म्हणून लोक बाळलीलांकडे दुर्लक्ष करतात. परंतु दहा वर्षांनंतरही धडपणे उभे राहता येत नसेल तर शंका वाटायला लागते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल पर्यायाने राज ठाकरे यांच्याबद्दल तसेच वाटायला लागले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेच्या निमित्ताने राज ठाकरे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. ‘नीट’ रद्द करण्याच्या मागणीसाठी पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केला. ‘नीट’ परीक्षेचा प्रश्न गंभीर आहे, हे खरेच. परंतु इथे राज ठाकरे यांच्या भूमिकेला फारसा अर्थ नाही

लोकराजा शाहू छत्रपती

इमेज
जातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ही अस्पृश्यता निवारणाशी संबंधित असलेली संकल्पना बऱ्यापैकी कालबाह्य झाली आहे. बेटीबंदीच्या निर्बंधाचा विळखा मात्र आजही कायम आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अलीकडच्या काळात सुरू केलेली आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांची चळवळ त्याचीच साक्ष देते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आंतरजातीय विवाहांचा जोरदार पुरस्कार केला होता. त्याच्याही खूप आधी म्हणजे आजपासून शंभरेक वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला होता.  शाहूराजे हे कृतीशील विचारवंत होते. त्यांनी केवळ भाषणे आणि कायदा करून विषय सोडून दिला नाही. त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली. आपली चुलतबहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकरांचे पुत्र यशवंतराव यांच्याशी निश्चित केला. मराठ्यातील उच्चकुलीन घराण्यांनी धनगर समाजाशी वैवाहिक संबंध निर्माण करण्याची ही घटना दुर्मीळ आणि तत्कालीन समाजाला पचनी

जिथे वाघांची हद्द सुरू होते…

इमेज
गेल्या काही वर्षांत ‘वाघ वाचवा’ ची साद सातत्याने घातली जातेय.   माणसांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न रोज सतावत असताना वाघांना जरा जास्तीच महत्त्व दिले जातेय, अशी ओरडही केली जात होती. वाघांनी माणूस मारल्यापेक्षा अनेकांचे बळी घेणारा एखादा नरभक्षक वाघ गावकऱ्यांनी मारला तर त्यासंदर्भातील बातम्यांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे अनेकांना पसंत पडत नव्हते. अर्थात त्याचे कारण वेगळे होते. वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे वन्यप्राणी गणनेमध्ये लक्षात येत होते आणि अशाच गतीने वाघांची संख्या कमी होऊ लागली तर पृथ्वीतलावरून वाघ नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जात होती. प्राण्यांची एखादी प्रजाती नष्ट होणे गंभीर असतेच, परंतु त्याहीपलीकडे त्या प्राण्याच्या अस्तित्वाचा आशय पोहोचवण्याची गरज असते. परंतु तो पोहोचवण्यात सर्वसंबंधित घटक कमी पडत होते. वाघ वाचवले आणि वाढवले पाहिजेत, परंतु ते का याचे नीट स्पष्टीकरण दिले जात नव्हते. आजसुद्धा वाघ वाचवण्याची गरज का आहे, याबाबतही आवश्यक ती जाणीवजागृती करण्याची गरज आहे. वाघांसंदर्भात अभ्यास करणारी मंडळी ही भूमिका मांडत असली तरी ती नीट पोहोच