पोस्ट्स

एप्रिल, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राज ठाकरे आणि अजित पवार

    ज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांसाठी आगामी काळात महाराष्ट्राचे मैदान गाजवणे फार सोपे आहे. खटकेबाज संवाद, चार-दोन वृत्तपत्रीय कात्रणे, पुरावे सादर करत असल्याच्या अविर्भावात केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि काही नेत्यांच्या नकला एवढ्या सामुग्रीवर मैदान गाजवता येते. आणि चेकाळलेल्या गर्दीकडे एकहाती सत्ता मागता येते. अमरावतीमध्ये तर त्यांनी, ‘राज ठाकरे एक पर्याय म्हणून उभा आहे, त्याचा स्वीकार करा’, असे आवाहन केले. काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांना पर्याय देण्यासाठी आपण समर्थ आहोत, अशी वातावरणनिर्मिती आतापासून करण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसतो.   महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहिला, तर कोणत्याही एका नेत्याच्या पदरात महाराष्ट्राने कधीच भरभरून दान टाकलेले नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रात नेत्यांचा व्यापक प्रभाव किंवा त्यांची स्वीकारार्हता हा भाग वेगळा आणि त्यांचे राजकीय पाठबळ हा भाग वेगळा. व्यापक प्रभावाबद्दल बोलायचे तर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, श