पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठा समाजाची खदखद कशामुळे ?

इमेज
राज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणालाच येत नाही. लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येणाऱ्या मराठा समाजाची ही प्रासंगिक खदखद आहे, काही साचत आलेल्या गोष्टी आहेत की यामध्ये भविष्यकालीन उलथापालथीची बीजं दडली आहेत, याबद्दलही कुणी ठोसपणे सांगू शकत नाही. एखाद्या सामाजिक घटनेसंदर्भात एवढी अनिश्चिततेची किंवा अंदाज बांधता न येण्याजोगी परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. मराठा समाज मोर्चांच्या संघटनासाठी निमित्त ठरले ते कोपर्डी येथील घटनेचे. या घटनेनंतर दलित-सवर्ण संघर्षाला चिथावणी देण्याचे, सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे प्रयत्न झाले. परंतु महाराष्ट्रात अपवाद म्हणूनही कुठे हिंसक प्रतिक्रिया उमटली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. कोपर्डीच्या घटनेनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी राजकीय पातळीवरून करण्यात आली. राज ठाकरे यांनी ती पहिल्यांदा केली. शरद पवार यांनी त्यासंदर्भात खूप सावध प्रतिक्रिया दिली. एवढ्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर येत असतील, तर त्यांच्या भावनांची दखल घ्यायला हवी, असे