गृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची
महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची अवस्था ‘गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छळण्याला’ अशी झाली आहे. एखाद्या व्यक्तिच्या मागे कुणी कुणी काय काय लावून द्यावे? साऱ्यांच्या नजरेत खुपणारे गृहखाते त्यांच्याकडे आहे. तासगावच्या एस. टी. स्टँडवर एखाद्याचा खिसा कापला, कुठे जातीय तणाव पसरला किंवा गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला..असे काहीही घडले तरी त्यासाठी आर. आर. पाटील यांना जबाबदार धरले जाते. अर्थात मंत्र्यांनी वेशांतर करून धाडसाने काळाबाजार उघड केल्याची किंवा डान्स बारची पाहणी केल्याची उदाहरणे या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी तासगाव-सांगलीच्या स्टँडवर वेशांतर करून पाकिटमारांना पकडून द्यावे, अशी अपेक्षा कुणी केली तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. आणि अत्यंत गुप्तपणे होणाऱ्या या कारवाईचे त्याहीपेक्षा गुप्त पद्धतीने चित्रण एखाद्या वृत्तवाहिनीने केले तरीही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. जमानाच तसा आहे. आर. आर. पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर ‘माझे तुमच्यावर लक्ष आहे’ असे नमूद करून कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी (पुराव्यानिशी) आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन केले आ...