पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गृहमंत्र्यांना भीती गुन्हेगारांच्या सावलीची

महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची अवस्था ‘गरीब बिचाऱ्या चिमणीला सारे टपले छळण्याला’ अशी झाली आहे. एखाद्या व्यक्तिच्या मागे कुणी कुणी काय काय लावून द्यावे? साऱ्यांच्या नजरेत खुपणारे गृहखाते त्यांच्याकडे आहे. तासगावच्या एस. टी. स्टँडवर एखाद्याचा खिसा कापला, कुठे जातीय तणाव पसरला किंवा गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला..असे काहीही घडले तरी त्यासाठी आर. आर. पाटील यांना जबाबदार धरले जाते. अर्थात मंत्र्यांनी वेशांतर करून धाडसाने काळाबाजार उघड केल्याची किंवा डान्स बारची पाहणी केल्याची उदाहरणे या महाराष्ट्रात घडली आहेत. त्यामुळे आर. आर. पाटील यांनी तासगाव-सांगलीच्या स्टँडवर वेशांतर करून पाकिटमारांना पकडून द्यावे, अशी अपेक्षा कुणी केली तरी त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. आणि अत्यंत गुप्तपणे होणाऱ्या या कारवाईचे त्याहीपेक्षा गुप्त पद्धतीने चित्रण एखाद्या वृत्तवाहिनीने केले तरीही त्याचे आश्चर्य वाटणार नाही. जमानाच तसा आहे. आर. आर. पाटील यांनी आपल्या ब्लॉगवर ‘माझे तुमच्यावर लक्ष आहे’ असे नमूद करून कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी (पुराव्यानिशी) आपल्याकडे पाठवण्याचे आवाहन केले आ

कंदिलाचे दिवस

‘जत्रा’ साप्ताहिक लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा प्रा. व. बा. बोधे यांची धारावाहिक कादंबरी हा त्यातील वाचकप्रिय भाग होता. त्यांच्या या कादंबरीसाठी काढलेली चित्रे दिलखेचक असायची. कादंबऱ्या वरकरणी साप्ताहिकाच्या प्रकृतीला साजेशा, थोडय़ाशा श्रंगारिक वळणाने जाणाऱ्या असाव्यात असे चित्रावरून वाटायचे. आणि वाचक त्याकडे वळायचा. मात्र प्रत्यक्षात या कादंबऱ्यांमध्ये गावकुसाबाहेरच्या भटक्यांच्या जगण्याचं चित्रण असायचं. त्यात कधी एखादी प्रेमकहाणी यायची. ती प्रा. बोधे यांच्या शैलीने अशी काही खुलवलेली असायची की वाचणारा त्यात अडकून जायचा. गोष्टीवेल्हाळ शैलीमुळे बोधे यांचे लिखाण कधी कंटाळवाणे वाटले नाही. आपल्या वाड्.मयीन संस्कृतीत लोकप्रिय लेखकाकडे काहीसे दुर्लक्ष केले जाते. बोधे यांनी ‘जत्रा’ मधून केलेले लेखन आणि त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता यामुळे त्यांच्या साहित्याकडे समीक्षकांनी गंभीरपणे पाहिले नाही. कोणत्याही ग्रामीण साहित्यिकापेक्षा बोधे यांनी केलेले ग्रामजीवनाचे चित्रण अधिक प्रभावी आणि गावगाडय़ाला व्यापकपणे कवेत घेणारे आहे. गाव, गावगाडा, बलुतेदारी, दलित जीवन आणि गावाबाहेरच्या भटक्यांच

डॉ. संजय राडकर..आपल्यापरीनं स्वच्छ..!

सरकारी कामं सुलभतेनं व्हावीत म्हणून निर्माण केलेली एक खिडकी योजना ही अलीकडच्या काही वर्षातील आहे. परंतु महसूल खात्यात आलेल्या एका नवख्या अधिकाऱ्यानं सुमारे 22 वर्षापूर्वी ती सुरू करून एक नवा पायंडा सुरू केला होता. संजय राडकर असं त्या अधिकाऱ्याचं नाव. उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्यानंतर पहिलीच प्रशिक्षणार्थी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथे तहसीलदार म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. तहसीलदार कार्यालयाइतकी सामान्य माणसांची नाडणूक अन्यत्र कुठे क्वचित होत असेल. शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यात सरकारी कामकाज म्हणजे लोकांना शिक्षाच होती. कारण तालुक्याच्या ठिकाणी कुठूनही यायचं तर आधी बरंचसं अंतर चालत यायचं आणि मग मिळेल त्या वाहनानं पोहोचायचं. म्हणजे एक पूर्ण दिवस मोडल्याशिवाय तहसीलदार कार्यालयात येणंच होत नाही. तिथं आल्यावर तिथल्या कारकून मंडळींकडून होणारी अडवणूक बोलायलाच नको. कुठल्याही दाखल्यासाठी महिनो न महिने चकरा माराव्या लागत. मोठय़ा साहेबाकडं जाऊन तक्रार करण्याचंही धारिष्टय़ नसायचं. महसूल खात्यातली पहिलीच नोकरी होती. दाखल्यासाठी लोकांची होणारी अडवणूक राडकरांना जाणवल्यावाचून राहि

पुढच्या पिढय़ांसाठी प्रश्न

गणित येत नाही म्हणून मास्तरच्या भीतीनं शाळा सोडून मुंबई गाठणारे गाववाले हमाली कमरेचा काटा ढिल्ला होईस्तोवर कारकून कनिष्ठ मध्यम बीए ऑनर्स एकवीस रुपये घालून आहेराचं पाकिट डिंकानं चिकटवणारे वडापाव मिसळ पुरीभाजीचे आश्रयदाते चिवटपणे जगणारे ओढग्रस्त जगता जगता पोपडे निघालेल्या संस्कृतीला गिलावा करण्यासाठी धडपडणारे हुंडाबंदीच्या घोषणा ऐकत ऐकत पोरीच्या हुंडय़ासाठी कणकण साठवणारे धरणाखाली गेली जमीन घरदार उरलेलं आयुष्य पुलाखाली सिग्नलला थांबलेल्या टॅंकरच्या तोटीला पाणी भरणारे हे प्रकल्पग्रस्त विकासानं उखडलेले डायनासोरच्या वाटेवरचे प्रवाशी ही चायनीजवर पोसलेली हायब्रीड जनरेशन नॉस्टाल्जिक झुणका भाकरीपुढे यांच्या मुताला फेस कोकाकोलासारखा हे जागतिक मंदीचे प्रवक्ते फाइव्ह स्टार हॉटेलात ब्रिफिंग करणारे कॉकटेल डिनर हे दलाल शेअर बाजारातले सेन्सेक्सवर रक्तदाब अवलंबून असणारे मार्केट क्लोज झाल्यावर रत्नपारखी सेक्सच्या बाजारातले ही रद्दी इंग्रजी पेपरांची महिन्याच्या बिलाइतकी मुद्दल शाबूत ठेवणारी हे हायकर्स ट्रेकर्स गडकिल्ल्यांवर पिकनिक करणारे हनिमूनच्या आधीच सेक्स अनुभवलेले नवविवाहित हिलस्टेशनवर हरवून जाणारे आठ

गावाकडची लखलखती वाट

धुळीचे लोट उडवीत गावात शिरणारी एसटी, रणरणत्या उन्हात एक घागर डोक्यावर आणि एक कमरेवर घेऊन माळरानाच्या वाटेवर दिसणाऱ्या बाया, झाडाखाली भरलेल्या शाळेत मुलांना शिकवणारे मास्तर, आजारी व्यक्तिला पाळण्यात घालून दवाखान्याच्या गावाकडे नेणारे गावकरी, दुथडी रोरावत वाहणाऱ्या नदीतून माणसांनी खचाखच भरलेली हेलकावे खात जाणारी नौका..ही कुठल्या चित्रकाराच्या चित्रमालिकेतील चित्रांची किंवा एखाद्या ग्रामीण साहित्यिकांच्या कथांमधली वर्णने नाहीत. वीसेक वर्षापूर्वी महाराष्ट्रात सर्रास अशी चित्रे पाहायला मिळत. अशी चित्रे किंवा कथा-कादंबऱ्यांमधले वर्णन कलेचा वेगळा आनंद देत असले तरी प्रत्यक्षात तसे जगणाऱ्या लोकांना मात्र त्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या वेदना शब्दांपलीकडच्या होत्या. परंतु ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्रात जे काम झाले, त्यामुळे खेडय़ा-पाडय़ांतील चित्र पार बदलून गेले. वर केलेले वर्णन चित्रकारांची चित्रे आणि कथा-कादंबऱ्यांपुरते मर्यादित बनले. ग्रामीण विकासामध्ये महाराष्ट्राने केलेली प्रगती या क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर ठेवणारी आहे. पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्राच्या एकूण विकासाला दिशा

साहित्य संमेलन आणि शिवसेनेचे ऱ्हासपर्व

आज जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखले जाते, ते 1878 मध्ये ग्रंथकार सभेचे अधिवेशन म्हणून सुरू झाले. म्हणजे या संमेलनाला 132 वर्षे झाली आहेत. केवळ ग्रंथकारांचे संमेलन म्हणून सुरू झालेल्या या संमेलनाबाबत कितीही आक्षेप असले तरी ते महाराष्ट्राचे प्रमुख सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. सुमारे दहा वर्षापूर्वी लोकप्रियता आणि लोकमान्यतेच्याबाबतीत कळस गाठलेल्या या संमेलनाच्या एकूणच इभ्रतीचा गेल्या काही वर्षात ज्या वेगाने ऱ्हास सुरू झाला आहे, तो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वावर या संमेलनाचा प्रभाव आहे, तसाच लक्षणीय प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक जीवनावर शिवसेनेने निर्माण केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या करिश्म्यावर भारतीय जनता पक्षाच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याइतपत ताकद त्यांनी कमावली होती. परंतु कोणत्याही विचाराशिवाय केवळ भावनिक मुद्दय़ांवर राजकारण करून लोकांना फार काळ फसवता येत नाही. म्हणूनच एकदा युतीकडे सत्ता दिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने तशी चूक पुन्हा केली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत वाईट क

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

मराठी कथा आशयदृष्टय़ा अधिक सशक्त बनण्याची प्रक्रिया अलीकडच्या काही वर्षात सुरू आहे. जयंत पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा संग्रह या प्रक्रियेला अधिक सजगपणे सामोरा जाताना दिसतो. नाटककार आणि पत्रकार म्हणून परिचित असलेल्या जयंत पवार यांनीही अनेक नामवंत लेखकांप्रमाणे दिवाळी अंकांची गरज म्हणून कथा लिहिण्यास प्रारंभ केला. प्रारंभी त्यांनीच तसे नमूद केले आहे. मागणीनुसार लिहिलेल्या कथा म्हणजे पाडलेल्या कथा असा समज होण्याची शक्यता असते, परंतु पवार यांच्यावर तसा आळ घेण्याचे धाडस कुणी करणार नाही, एवढय़ा त्यांच्या कथा आशयदृष्टय़ा सशक्त आहेत. ते या सात वर्षाच्या काळात लिहिलेल्या सात कथांचा संग्रहात समावेश आहे. मराठीत भाऊ पाध्येंचा अपवाद वगळता महानगरी संवेदनेची कथा तेवढय़ा ताकदीने कुणी लिहिली नाही. महानगरी संवेदनेची कथा म्हणून समीक्षकांनी गौरवलेली अन्य जी कथा आहे, ती खरेतर त्या त्या लेखकांच्या समकालीन, समकंपू, समविचारी अशा लेखक-समीक्षकांनीच प्राधान्याने गौरवलेली कथा आहे. एकूण मराठी कथेच्या पसाऱ्यात तिचे अस्तित्व अगदीच क्षीण राहिले. अर्थात माणसांच्या जगण्यापासून फारकत घेऊन केवळ मनोविश्लेषणाच्

मलबार हिलला रस्त्याकडेला सापडलेली काही पाने

दिवसेंदिवस महागाई वाढत चाललीय. गरीब माणसाचं जगणं अवघड बनत चाललंय. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याच्या निर्णयामुळं आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्य माणसाची दोन वेळा हाता-तोंडाची गाठ पडतेय. सामान्य माणसाला विकासाच्या महामार्गावर नेऊन उभं केलं पाहिजे, असं मोठमोठे विचारवंत म्हणतात, ते खरंच आहे. मुंबईतल्या अशा सामान्यातल्या अतिसामान्य माणसाला महामार्गावर उभं करायला पाहिजे. म्हणजे ते पुण्याकडं पुढा करून. पण त्यासाठी वाशीच्या पुढं नेऊन उभं करायला पाहिजे. नाहीतर मुंबईतल्या मुंबईतच रस्ते आणि फ्लायओव्हरच्या चक्रव्यूहात फिरत राहतील. त्यांनी महामार्गावरून सरळ चालत जायला हवं. राष्ट्रकूलमध्ये आपले खेळाडू प्रमाणापेक्षा जास्तच पदकं मिळवायला लागलेत. पदकं हे मिळवतात आणि त्याचा त्रास सरकारला होतो. ते तिकडं बंगाल, हरियाणावाले पदक मिळवणाऱ्याला मोठमोठी बक्षिसं देतात. लाजेकाजेस्तव आम्हालाही काही द्यावं लागतं. खेळाडूंनी सरकारच्या परिस्थितीचा विचार करून कामगिरी करावी, असं आवाहन करायला हवं. बक्षिसं द्या. त्यांना नोकऱ्या द्या. त्याही चांगल्या द्या. ते सगळं ठीक आहे, वर त्यांना आपल्या कोटय़ातून घरं द्य

आबा, आता मांडी मोठी करा !

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुन्हेगारांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी साजरी केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी असा विषय म्हणजे पर्वणीच असते, त्यामुळे तो भरपूर वाजवला, मात्र त्याचवेळी मु्िरत माध्यमांनी मात्र ते फारसे गंभीरपणे घेतले नाही. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे संशयाचा फायदा फलंदाजाला दिला जातो, त्याप्रमाणे आर. आर. पाटील यांना संशयाचा फायदा देऊन प्रकरण फारसे वाढवले नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे तसे नसते. सर्वात पुढे राहण्यासाठी किंवा तसे भासवण्यासाठी अनेक फालतू गोष्टींनाही अवास्तव महत्त्व देऊन त्याचा गाजावाजा केला जातो. अर्थात ती त्यांची गरज असते. इथे तर राज्याचे गृहमंत्री गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसत होते. गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी नसीम सिद्दीकींच्या सतराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये फुलांचे ताटवे फुलले होते. या भेटीचे फुटेज म्हणजे वृत्तवाहिन्यांसाठी घबाडच होते. त्याची उलट सुलट चर्चा झाली. आरोप आणि खुलासेही झाले. प्रकरण घडून आठवडा उलटला असल्यामुळे आर. आर. पाटील यांनी यातून आपली सोडवणूक करुन घेण्यात यश मिळवले