पोस्ट्स

डिसेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाघ, माणूस आणि संशोधक

इमेज
बेळगावजवळच्या खानापूर परिसरात जवळजवळ सव्वा महिना एका नरभक्षक वाघामुळे हलकल्लोळ माजला होता. वाघाला गोळ्या घालून ठार मारल्यानंतर परिसर भीतीच्या छायेतून मुक्त झाला. खरेतर खानापूर परिसराला वाघाचे तसे अप्रूप नाही. बेळगाव वनविभागांतर्गत असलेल्या खानापूर तालुक्यातील जंगलांत सहा ते सात वाघ आहेत. तालुक्यातील नागरगाळी, लोंढा, भीमगड व कणकुंबी या वनक्षेत्रातच वाघांचे अस्तित्व आहे. सन २०११-१२ मध्ये भीमगडला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे भीमगड वेगळे वनक्षेत्र बनले. अभयारण्याचे कायदे लागू झाल्याने या वनक्षेत्राला संरक्षण लाभले. परिणामी वाघांची संख्या वाढू लागली. बेळगावपासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमगडच्या जंगलात १९ नोव्हेंबरला वनखात्याने एक नरभक्षक वाघ सोडला. या वाघाने चिकमंगळूर येथे एका महिलेचा बळी घेतला होता. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले होते. तिथून दांडेलीच्या जंगलात सोडण्यासाठी नेले, मात्र स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केल्यामुळे वनखात्याचे लोक वाघाला घेऊन खानापूरच्या भीमगड जंगलात आले. स्थानिक लोकांना कल्पना न देताच वाघ जंगलात सोडण्यात आला. ही वार्ता कळताच पर

यशवंतराव आणि शरदराव, पृथ्वीराज, देवेंद्र....

इमेज
२५ नोव्हेंबरची पहाट. प्रीतिसंगमाचा रम्य परिसर. हवेत गारवा होता. गारठा जाणवत होता. दरवर्षी या सुमारास गोठवून टाकणारी थंडी असते, तशी यंदा नव्हती. यशवंतरावांना जाग आली. खरंतर रात्रीपासूनच त्यांना काहीशी अस्वस्थता जाणवत होती. बेचैनी नव्हे, पण हुरहूर लागून राहिली होती. दरवर्षी २५ नोव्हेंबर येतो.पण यशवंतरावांची आजची अस्वस्थता थोडी वेगळी होती. महिनाभरापूर्वी राज्यातली परिस्थिती बदलली आहे. नवे राज्यकर्ते आले आहेत. त्यांची राजकीय विचारसरणी वेगळी आहे. त्यांचे राजकारणातले आदर्श वेगळे आहेत. अशा परिस्थितीत आजचा दिवस कसा असेल ? एरव्ही कोण येईल आणि कोण येणार नाही याचा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. आजही असा विचार मनात येण्याचे काही कारण नव्हते. पण तसे विचार येत होते ही वस्तुस्थिती होती. यशवंतरावांनी मनोमन ठवरले. फार बोलायला नको. फार लोकांशी बोलायला नको. पण ज्यांच्याशी बोलणे गरजेचे आहे , त्यांच्याशी तेवढेच बोलू. किमान आपला महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय, हे तरी विचारू. अभिवादन करायला येणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना पाहून यशवंतरावांना मागच्यावेळची गंमत आठवली. म्हणजे बारा मार्चची. असाच साय