पोस्ट्स

जून, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मंत्रालय जळाले, प्रवृत्तीही जळाव्या

इमेज
  ‘ चंद्रपूर किंवा आणखी कुठल्या तरी लांबच्या जिल्ह्यात झोपडय़ांना आग लागली , पाच-सातशे झोपडय़ा जळून खाक झाल्या , सगळ्या लोकांचे संसार उघडय़ावर आले आणि माणसांच्या जीवन-मरणाचा कितीही निकडीचा प्रश्न असला तरी तो विषय मंत्रालयात आल्यावर ‘ एक फाईल ’ यापलीकडे त्याला फारशी किंमत नसते. तिथं माणसं कितीही टाचा घासत असली तरी मंत्रालय आपल्या गतीनं चाललेलं असतं. इथल्या लोकांना कुणाची काही पडलेली नसते.. ’ मंत्रालयात काम करीत असूनही संवेदनशील असलेले एक अधिकारी मंत्रालयाच्या कामकाजासंदर्भात सांगत होते. सरकारी सेवेतलेच आणखी एक सचोटीने काम करणारे अधिकारी आहेत. अनेक वर्षे मंत्रालयात काम केलेले , परंतु सध्या मंत्रालयाच्या इमारतीत नाहीत , ते म्हणाले , ‘ मंत्रालयात काम करताना मला नेहमी जाणवायचं , की या इमारतीत प्रचंड निगेटिव्हव व्हायब्रेशन्स आहेत. इथं कधीही काहीतरी वाईट घडू शकतं. परवा आग लागल्यावर मला त्याची प्रचिती आली. ’ फेसबुकवर उथळपणे बडबड करणाऱ्या लोकांच्या या प्रतिक्रिया नाहीत किंवा सरकारी यंत्रणेविषयी द्वेषाची पेरणी करणाऱ्या सिव्हिल सोसायटीतल्या कुणा वाचाळवीरांच्याही प्रतिक्रिया नाहीत. मंत्राल

गोविंदराव पानसरे : कष्टकऱ्यांच्या चळवळीचा आधारस्तंभ

इमेज
महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत कोल्हापूरचे नेतृत्व फारसे ठळकपणे दिसत नाही. रत्नाप्पा कुंभार , बाळासाहेब देसाई एवढीच नावे चटकन लक्षात येतात. सत्तेच्या राजकारणात कोल्हापूर पिछाडीवर असले तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी मात्र कोल्हापूरने सातत्याने महाराष्ट्राला नेतृत्व दिले. राजर्षी शाहू महाराज , भाई माधवराव बागल , कॉम्रेड संतराम पाटील , कॉम्रेड यशवंत चव्हाण , प्रा. एन. डी. पाटील , कॉम्रेड गोविंदराव पानसरे , राजू शेट्टी या नावांवर नजर टाकली तरी प्रबोधनाच्या चळवळीसाठी , कष्टकऱ्यांच्या लढाईसाठी कोल्हापूरने महाराष्ट्राला काय दिले आहे , याची कल्पना येते. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टने गोविंदराव पानसरे यांना शाहू पुरस्कार जाहीर करून महाराष्ट्रातील चळवळींचा आधारस्तंभ बनलेल्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. वयाची अमृतमहोत्सवी वाटचाल केलेल्या गोविंदराव पानसरे यांच्या आयुष्यातील सहा दशके कोल्हापुरात गेली. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार हे त्यांचे गाव. कोल्हार ते कोल्हापूर असा त्यांचा विलक्षण प्रवास आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले गोविंदराव पंधराव्या वर्षी पत्की गुरुजींच्

डाव्यांचे नवे रक्तचरित्र

‘ एकाला गोळी घातली , दुसऱ्याला भोसकले आणि तिसऱ्याला मरेर्पयत मारले.. ’ हे कुठल्या सिनेमाच्या कथेतले वर्णन नव्हे किंवा एखाद्या सुपारी किलरने खासगी बैठकीत मारलेली बढाईही नव्हे. केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने जाहीर सभेत ही कबुली दिली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी -मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कशा हत्या केल्या , याचे वर्णन माकपचे एक ज्येष्ठ नेते एम. एम. मणी यांनी केरळमधील मुवत्तुपुझा येथील जाहीर सभेत केले. त्यामुळे केरळसह संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही याबाबत माकप नेतृत्वाकडे खुलाशाची मागणी केली आहे. जाहीर सभेत मणी म्हणाले की , पक्षाला किंवा मार्क्‍सवादी विचारधारेला विरोध करणाऱ्यांची यादीच आम्ही बनवली होती ,   पासून अशा   कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. बेबी अँचेरी यांना नोव्हेंबर   मध्ये गोळी घालून ठार केले. जानेवारी   मध्ये मुल्लनचिरा मथाई यांना बेदम मारहाण करून ठार केले , तर जून   मध्ये मुत्तुकड नानप्पन यांना भोसकून मारले. वीस वर्षापूर्वीच्या या घटनांना आता उजाळा मिळाला असला तरी