पोस्ट्स

डाव्यांचे नवे रक्तचरित्र

‘ एकाला गोळी घातली , दुसऱ्याला भोसकले आणि तिसऱ्याला मरेर्पयत मारले.. ’ हे कुठल्या सिनेमाच्या कथेतले वर्णन नव्हे किंवा एखाद्या सुपारी किलरने खासगी बैठकीत मारलेली बढाईही नव्हे. केरळमध्ये मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने जाहीर सभेत ही कबुली दिली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी -मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कशा हत्या केल्या , याचे वर्णन माकपचे एक ज्येष्ठ नेते एम. एम. मणी यांनी केरळमधील मुवत्तुपुझा येथील जाहीर सभेत केले. त्यामुळे केरळसह संपूर्ण देशभर खळबळ उडाली असून भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही याबाबत माकप नेतृत्वाकडे खुलाशाची मागणी केली आहे. जाहीर सभेत मणी म्हणाले की , पक्षाला किंवा मार्क्‍सवादी विचारधारेला विरोध करणाऱ्यांची यादीच आम्ही बनवली होती ,   पासून अशा   कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. बेबी अँचेरी यांना नोव्हेंबर   मध्ये गोळी घालून ठार केले. जानेवारी   मध्ये मुल्लनचिरा मथाई यांना बेदम मारहाण करून ठार केले , तर जून   मध्ये मुत्तुकड नानप्पन यांना भोसकून मारले. वीस वर्षापूर्वीच्या या घटनांना आ...

वाघ कशासाठी वाचवायचे ?

इमेज
चं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि ते त्याची हत्या करण्याच्या तयारीत आहेत. परंतु वनखात्याचे लोक वाघाची हत्या करणाऱ्या लोकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार करतात आणि वाघाचे प्राण वाचवतात.. लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकातसुद्धा अशी गोष्ट बाळबोध वाटेल. परंतु अशा बाळबोध व्यवहारावरच सरकारचे गाडे चाललेले असते. वाघाची शिकार करताना कुणी आढळल्यास गोळ्या घालण्याचा आदेश हा त्यातलाच प्रकार आहे. वाघ वाचवण्यासाठी प्रत्यक्षात काही करायचे नाही आणि खूप काही करतो आहोत , असे भासवण्याचे प्रयत्न केले जातात. केवळ महाराष्ट्रापुरते नव्हे , तर संपूर्ण देशभर अशीच परिस्थिती आहे. वाघ वाचवण्याची नुसती आवाहने केली जात आहेत. त्यासाठी मोहिमा राबवल्या जात आहे , तरीही वाघांच्या हत्या होतच आहेत. मध्ये आतार्पयत   वाघांच्या हत्या झाल्यात. चं्रपूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तीन वाघांच्या हत्या होणे केवळ धक्कादायकच नव्हे , तर नामुष्कीजनक आहे. याच आठवडय़ात चं्रपूर-लोहारा रस्त्यावर वाघाच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले ह...

व्यंगचित्र आणि संसदेचा शाळकरी गोंधळ

इमेज
‘ देशातील जनतेच्या आशाआकांक्षा आणि मूलभूत तत्त्वांना सामावून घेणारी संहिता सादर करणाऱ्या आपल्या घटनाकारांचे शहाणपण आणि त्यांच्या दूरदृष्टीचा हा परिपाक आहे. अनेक देशांच्या घटना केवळ कागदी गठ्ठयांमध्ये बंदिस्त राहिल्या असताना ही अतिशय गुंतागुंतीची संहिता केवळ कागदोपत्री न राहाता आपल्या जगण्यातले वास्तव बनले त्यामागे हेच कारण आहे. भारताची राज्यघटना हा एक आगळा दस्तावेज आहे , जो इतर अनेक देशांच्या घटनांसाठी पथदर्शक ठरला. यात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेचे नाव घ्यावे लागेल. तीन वर्षाच्या प्रदीर्घ आणि अखंड शोधामागील मुख्य उद्देश हा घटनेत योग्य संतुलन साधण्याचा होता , जेणेकरून घटनेनुसार ज्या संस्थांची निर्मिती करावयाची आहे , त्या केवळ तात्पुरत्या , घाईघाईत केलेल्या न ठरता प्रदीर्घ काळासाठी भारतीय जनतेच्या आकांक्षांना सामावून घेण्याचे सामथ्र्य त्यांच्यात निर्माण व्हावे. ’ - एनसीईआरटीच्या अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा हा निष्कर्ष आहे. ज्या प्रकरणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वादग्रस्त व्यंगचित्र आहे , त्या प्रकरणाच्या समारोपामध्ये हा निष्कर्ष दिला आहे. ...

जादूटोणाविरोधी विधेयकाला मुहूर्त मिळेल का ?

दिवेआगरच्या सुवर्ण गणेशाच्या चोरीनंतर संपूर्ण राज्यभर गदारोळ उठला. कुठेही चोरी होणे आणि चोरटे लवकर न सापडणे या बाबी कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टिने भूषणावह नसतात , हे खरेच. परंतु ज्यांचे राजकारणच देव-धर्माच्या आधारावर चालते , त्या शिवसेना भाजपच्या नेत्यांनी या चोरीवरून जो काही गहजब केला , तो फक्त त्यांनाच शोभून दिसणारा होता. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी दिवेआगरला भेट दिली नाही म्हणून शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी टीका केली. मुख्यमंत्री वगैरे मंडळी दिवेआगरला जाऊन काय करणार होती , हा प्रश्न वेगळा. मूर्तीचोरीच्या घटनेनंतर त्याचे राजकारण करण्यासाठी काही तासांत तिथे धडकणाऱ्या उद्धव ठाकरे यांना दुष्काळी भागात जाण्यासाठी मात्र दोन महिने वाट पाहावी लागली , यावरून त्यांचे प्राधान्यक्रम काय आहेत , हे लक्षात येते. त्यांच्या असल्या वृत्तीमुळेच महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदा सत्तेवरून खाली उतरल्यानंतर नंतर सत्तेच्या परिघात फिरकू दिलेले नाही. दिवेआगरच्या घटनेनंतर तरी शहाण्यासुरत्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी , की जागृत देवस्थान वगैरे म्हटले जाते , त...

डीसिकाची ‘सायकल’ आणि पिंजानीचा ‘बँडबाजा’

इमेज
‘ बायसिकल थीव्ज ’ हा व्हिट्टोरिओ डीसिका या दिग्दर्शकाचा एकोणिसशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट. जागतिक सिनेमामधला मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या या चित्रपटाची आठवण राजेश पिंजानी दिग्दर्शित ‘ बाबू बँडबाजा ’ हा मराठी चित्रपट पाहिल्यानंतर येते. दुसऱ्या महायुद्धानंतर इटलीमध्ये आलेल्या आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर सामान्य माणसाचे जगणे किती कठिण बनले , याचे चित्रण ‘ बायसिकल थीव्ज ’ मध्ये आहे. तर जागतिकीकरणाच्या आक्रमणामुळं इथले छोटे व्यावसायिक , पारंपारिक कलावंत यांचे जगणे मुश्किल करून टाकल्याचे ‘ बाबू बँडबाजा ’ मधून दिसते. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या या चित्रपटाच्या वाटय़ाला म्हणावे तसे कौतुक आलेले नाही. त्याच्या पुढेमागे प्रदर्शित झालेल्या अन्य चित्रपटांबद्दल सगळीकडे धोधो प्रसिद्धीचे पाट वाहताहेत. परंतु त्यापेक्षा गुणवत्तेच्या पातळीवर अनेक पटींनी सरस असलेल्या ‘ बाबू बँडबाजा ’ सिनेमाला पुन्हा बाजारीकरणानेच मारल्याचे दिसून येते. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इटलीत आलेल्या आर्थिक मंदीच्या काळातील अस्तित्वासाठी झगडणाऱ्या सामान्य माणसाची कथा ‘ बायसिकल थीव्ज ’ ...

देवाची चोरी आणि सामूहिक दिवाळखोरी

   चित्रपट सृष्टीत सध्या सीक्वेलचा जमाना आहे. मराठीत मूळ सिनेमाच्या कर्जानेच निर्माता एवढा घाईला येतो , की सीक्वेलच्या भानगडीत पडण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदीच्या अनुकरणाची मोठी परंपरा असूनही मराठीने अद्याप तो रस्ता धरलेला नाही. परंतु प्रयोग म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ देऊळ ’ चित्रपटाचा सीक्वेल काढायला हरकत नाही.   कथेसाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. दिवेआगर येथील सतरा नोव्हेंबर एकोणिसशे सत्त्याण्णव ते तेवीस मार्च दोन हजार बारा या काळाशी साधम्र्य असणारे चित्रण आताच्या चित्रपटात आले आहे. तेवीस मार्च दोन हजार बारा नंतरच्या घटना जशाच्या तशा घेतल्या तरी पहिल्यापेक्षा सरस चित्रपट होईल. मग त्यात उद्धव ठाकरे यांच्यापासून विनोद तावडे यांच्यार्पयतची अनेक पात्रे घेता येतील. देऊळ सिनेमाला विरोध करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तो परत घेण्याची मागणी करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या धर्मरक्षकांनाही संधी देता येईल. विधिमंडळात मूर्ती नेऊन आरती करणाऱ्या आमदारांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकता येईल. हे सगळे ऑस्करच्या तोडीचे आहे , हे कुणाच्याही लक्षात येईल. ...

मैली गंगा वाहतच राहते..

  गंगा नदीसंदर्भात एक कथा सांगितली जाते. सगरपुत्रांची कथा म्हणून उत्तर भारतात ती परिचित आहे. सगर नावाचा रघुवंशातील एक सम्राट होता. त्याच्या एक हजार पुत्रांनी काही कारणामुळे देशाच्या एका भागात वाईट पद्धतीने खोदकाम केले. त्यामुळे एका ष्टद्ध r( ७०)षिचा कोप झाला आणि त्याने दिलेल्या शापामुळे सगळेच्या सगळे म्हणजे एक हजार सगरपुत्र जळून भस्म झाले. त्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांचा वंशज भगीरथाने अभूतपूर्व तपस्या केली आणि गंगा आणून त्यांना शापमुक्त केले. अशी ती कथा आहे. आज देशभर गंगा नदी आणि तिचे प्रदुषण हा चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. आगरवाल यांच्या उपोषणामुळे गंगेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची   एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तूर्त तरी गंगेसंदर्भात एवढीच नवी घडामोड घडली आहे. बाकी गंगेचे प्रदुषण वर्षानुवर्षे चालत आले आहे , ते तसेच पुढे सुरू आहे. गंगेच्या आजच्या स्थितीसंदर्भात गांधी शांति प्रतिष्ठानचे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी अनुपम मिश्र सगरपुत्रांच्या कथेचा दाखला देऊन सांगतात , ‘ आज नव्या जमान्यातले सगरपुत्...