एका ‘सुपारी’ची डायरी
आम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स्पाँटेनिअस ओव्हरफ्लो म्हणतात तशी भस्सकन ओळ आली, ‘आम्हाला वगळा गतप्रभ होतील राजकारणे..’ आजच्या काळात इतकी वास्तवदर्शी ओळ कुणाला सुचायची टाप नाही. काव्यगायनाच्या सुपाऱ्या घेऊन गावोगावी िहडणाऱ्या कवींनी तर नादच करायला नको. सुपारी अंगातच असावी लागते. छपरी मिशा वाढवल्या आणि बटवा बाळगून सुपारी चघळली म्हणून इतकं वास्तववादी सुचणार नाही, मिस्टर नायगावकर. त्यासाठी कवितेतली सुपिरिअॅरिटी नव्हे तर वागण्या-बोलण्यात आणि जगण्यातही सुपारिअॅलिटी हवी. कवींचा एवढा राग राग का करतेय, असं वाटत असेल ना तुम्हाला? कशासाठी त्यांच्याबद्दल प्रेम बाळगायचं? बाईच्या जातीला धार्जिण असलेल्या या कवडय़ांना सुपारीची अॅलर्जी का म्हणते मी? सगळं चालतं त्यांना. ताडीमाडीब्रँडीव्हिस्कीतंबाखूसिगारेट. फक्त सुपारीचं वावडं. ते कोण एक बापट कवी वसंत समाजवादी, जायाचंच की कवातरी पट्दिशी म्हणायचेत कुठल्याही स्टेजवरून. त्यांनी लिहिली होती एक कविता सुपारीवर. काय तर म्हणे कवितेतला नायक लग्न झालेल्या ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा