सूर्याच्या जाणाऱ्या रथातून - कृष्ण कुमार रत्तू

काही होत असतं
शून्यामध्ये

शून्य कधी पूर्ण होत नाही
कारण रितेपणात मोक्ष नाही मिळत
एक बिंदू असतो, शेवटी
जिथून होत असते जगण्याची सुरुवात
तुम्ही पराभूत झालात तर
जीवन पराभूत होतं
तुम्ही चालत राहता,
खळाळत वाहतो, अवखळ बनतो
जगण्याचा प्रवाह

जेव्हा पुष्कळ काही आपलं होत नाही
तरीसुद्ध
जमीन आणि आकाशाचा
असतोच आपला वाटा
तुमच्या पायावर आणि माथ्यावर
सगळं आकाश कधी
तुमचं स्वत:चं असत नाही
रोजचीच असते
प्रदक्षिणा

तुम्ही प्रत्येक क्षणी बदलत असता
बघत असता
घडणारं - बिघडणारं जग
कधी विचार करता
सूर्य हातात पकडण्याचा
परंतु हे विसरून जाता की
आपणही प्रवासी आहोत
सूर्याच्या जाणाऱ्या रथातून उतरणारे

तुम्ही कधी विचार केलाय का, की
कधी असंही होत असतं
अलीकडं बदलले आहेत पोशाख
राहिले आहेत दूरवर स्वप्नांचे शीलालेख
आता वाचायला
कुणाकडे आहे सवड

पुष्कळ काही सुटून जात असतं
प्रत्येकवेळी पुढच्या प्रवासाच्या संदर्भात
थकवा आणणारं गुंतागुंतीचं, डोळ्यांमध्ये
जेव्हा स्वप्नं नसतात
तेव्हा माणूस किती निरीच्छ होत असतो

कळत नाही तरीही का लक्षात ठेवतो
पुढच्या प्रवासाच्या असंख्य शक्यता
आणि डोळ्यांमध्ये स्वप्नांचं इं्रधनुष्य

(
आकाशवाणीवर पंचवीस जानेवारीला झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात सादर केलेला पंजाबी कवितेचा मराठी अनुवाद)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर