पोस्ट्स

मार्च, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैली गंगा वाहतच राहते..

  गंगा नदीसंदर्भात एक कथा सांगितली जाते. सगरपुत्रांची कथा म्हणून उत्तर भारतात ती परिचित आहे. सगर नावाचा रघुवंशातील एक सम्राट होता. त्याच्या एक हजार पुत्रांनी काही कारणामुळे देशाच्या एका भागात वाईट पद्धतीने खोदकाम केले. त्यामुळे एका ष्टद्ध r( ७०)षिचा कोप झाला आणि त्याने दिलेल्या शापामुळे सगळेच्या सगळे म्हणजे एक हजार सगरपुत्र जळून भस्म झाले. त्यांना मुक्ती देण्यासाठी त्यांचा वंशज भगीरथाने अभूतपूर्व तपस्या केली आणि गंगा आणून त्यांना शापमुक्त केले. अशी ती कथा आहे. आज देशभर गंगा नदी आणि तिचे प्रदुषण हा चर्चेचा विषय आहे. ज्येष्ठ पर्यावरणवादी जी. डी. आगरवाल यांच्या उपोषणामुळे गंगेचा विषय पुन्हा चर्चेत आला असून राष्ट्रीय गंगा नदी खोरे प्राधिकरणाची   एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तूर्त तरी गंगेसंदर्भात एवढीच नवी घडामोड घडली आहे. बाकी गंगेचे प्रदुषण वर्षानुवर्षे चालत आले आहे , ते तसेच पुढे सुरू आहे. गंगेच्या आजच्या स्थितीसंदर्भात गांधी शांति प्रतिष्ठानचे ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी अनुपम मिश्र सगरपुत्रांच्या कथेचा दाखला देऊन सांगतात , ‘ आज नव्या जमान्यातले सगरपुत्र पुन्हा

नागनाथअण्णा नावाची दंतकथा !

इमेज
  स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्याची संकल्पना वास्तवात आणण्यासाठी ज्या मोजक्या लोकांनी प्रयत्न केले , त्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत केलेलं कार्य मोठं होतं , परंतु त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर त्यांनी केलेलं कार्य खूप मोलाचं आहे. हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी सहकारी चळवळीतलं आदर्श मॉडेल वाळवा येथे उभं केलं. राज्यातील सहकारातल्या नेत्यांनी कारखान्याच्या माध्यमातून स्वत:च्या तुंबडय़ा भरल्या. नागनाथअण्णांनी कारखान्याच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळींना बळ दिलं. जिवंतपणी दंतकथा बनण्याचं भाग्य फार थोडय़ा लोकांना लाभतं , त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांचा समावेश होतो. नागनाथअण्णांचा सामाजिक चेहरा गेल्या पंचवीस वर्षात पुढं आला आहे. त्याआधी त्यांच्याबद्दलच्या दंतकथाच खूप चर्चेत असायच्या. दक्षिण महाराष्ट्रातच नव्हे तर त्यांच्या वाळव्यालगतच्या शिराळा तालुक्यातही या दंतकथांची चर्चा व्हायची. नागनाथ नायकवडी यांनी फासेपारधी पाळले असून त्यांच्या दरोडेखोराच्य

मूर्तीमंत साधे गणपतराव

इमेज
  पांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल्यानंतर या माणसाने दहा निवडणुका जिंकल्यात , यावर विश्वास बसत नाही. कारण आमदाराची आजच्या काळातील प्रतिमा खूप वेगळी आहे. राजकारणही खूप झपाटय़ानं बदलतंय. माणसांची मनं आणि मतं बदलताहेत. परंतु या बाजारात बदलले नाहीत , ते गणपतराव देशमुख आणि त्यांचा सांगोला मतदारसंघ. तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांप्रती असलेली गणपतरावांचीतळमळ कणभरही कमी झालेली नाही.   च्या दुष्काळाचा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरला भेट दिली होती. त्यावेळी वसंतराव नाईक वगैरेंच्यासोबत गणपतरावांनी विमानतळावर इंदिराजींची भेट घेतली. दुष्काळाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी इंदिराजींकडे केल्या. त्याचवेळी एक मागणी होती , समान काम समान दाम अशी. त्यावेळी पुरुषांना तीन रुपये आणि महिलांना अडीच रुपये मजुरी होती. गणतपतरावांनी ती समान करण्याची मागणी केली आणि इंदिराजींनी तिथल्या तिथे ती मंजूर केली. तळमळीचा हाच धागा घेऊन त्यांची वाटचाल आजही सुरू आहे. गणपतरावांचे मूळ गाव मोहोळ तालुक्या

काँग्रेसला हवे आहेत गेहलोत, वायएसआर..

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये मणिपूरसारख्या छोटय़ाशा राज्यामध्ये काँग्रेसला सत्ता टिकवता आली. राहुल गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावूनही उत्तर प्रदेशात काँग्रेसला हवे तसे यश मिळू शकले नाही. सत्ता मिळण्याची अपेक्षा असलेल्या पंजाबमध्येही ती मिळाली नाही. उत्तराखंडमध्ये सत्ता मिळाली असली तरी संख्याबळ भाजपपेक्षा फक्त एकने जास्ती आहे आणि त्याहीपेक्षा मुख्यमंत्रिपदासाठी विजय बहुगुणा यांचे नाव जाहीर झाल्यानंतर कें्रीय मंत्री हरिश रावत यांनी जो तमाशा सुरू केला आहे , तो काँग्रेसची पुरती बेअब्रू करणारा आहे. गोव्यातील सत्ता काँग्रेसवाल्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने घालवली. या निकालांच्या पाश्र्वभूमीवर देशातील चित्र पाहिले असता , काँग्रेसची अवस्था अत्यंत केविलवाणी असल्याचे दिसून येते. नजिकच्या काळात अनेक पातळ्यांवर दुरुस्ती केली नाही , तर येत्या लोकसभा निवडणुकीत जे काही होईल , ते केवळ पाहात बसणेच नशिबी येईल. सध्या देशातील बारा राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. त्यात फक्त राजस्थान आणि आंध्र प्रदेश ही दोन महत्त्वाची राज्ये आहेत. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असले तरीही तिथे अध