गांधीविचारांचा ‘अनुपम’ पाईक




  अलीकडच्या काही वर्षात गांधी, गांधीवाद, गांधीगिरी या विषयावर बोलण्याची फॅशन बनली आहे. अण्णा हजारे प्रतिगांधी असल्याच्या थाटात राळेगणसिद्धीपासून दिल्लीर्पयत मिरवू लागले आहेत. ऊस दरासाठी आंदोलन करताना हिंसाचाराला चिथावणी देणारे खासदार राजू शेट्टीसुद्धा आपण अजित पवारांच्या दादागिरीच्या विरोधात गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याची भाषा करू लागले आहेत. या लोकांनी गांधीजींच्या नावाचा इतक्या सवंगपणे वापर सुरू केला आहे की, नवख्या लोकांचा गांधीजी आणि त्यांच्या मार्गाबद्दल गैरसमज झाल्यावाचून राहणार नाही. यापुढील काळात गांधीजींच्या किंवा गांधीमार्गाच्या अशा भ्रष्ट आवृत्त्याच पाहायला मिळणार का, असाही प्रश्न मनात आल्यावाचून राहात नाही. गांधीवादाचे प्रामाणिकपणे आचरण करणारे, गांधीजींच्या विचारधारेशी अधिकाधिक प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणारे जीव या भारतभूमीवर आस्तित्वात आहे का, असाही प्रश्न पडल्यावाचून राहात नाही. बरेचसे गांधीवादी खादी भांडार किंवा गांधी विचारांच्या पुस्तकांच्या दुकानांतून दिसतात. अशी दुकाने गांधीवाद्यांची म्युझियमच बनली आहेत. हे बहुतेक थकलेले लोक आहेत. देशात जे क्रियाशील गांधीवादी आहेत, त्यामध्ये अनुपम मिश्र यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. दिल्लीतल्या गांधी शांति प्रतिष्ठानचे काम पाहणारे अनुपम मिश्र हे एक वेगळेच रसायन आहे. आजच्या काळातला गांधीवादी कसा असायला हवा, हे त्यांच्याकडे पाहून कळते. अनुपम मिश्र यांना जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
या गृहस्थांचा संपर्क एका पुस्तकाच्या निमित्ताने आला. राजस्थान की रजत बूंदेनावाचे त्यांचे पुस्तक आहे. वेगळ्या संदर्भासाठी ते हवे होते. त्या पुस्तकाचे प्रकाशन गांधी शांति प्रतिष्ठानने केले होते. म्हणून प्रतिष्ठानला पत्र पाठवून पुस्तक व्हीपीपीने पाठवण्याची विनंती केली, किंवा पुस्तकाची किंमत कळवल्यास मनीऑर्डर करतो, मग पाठवून द्या, असे लिहिले. त्यावर उलटटपाली थेट पुस्तकच हातात आल, त्यासोबत अनुपम मिश्र यांचे पत्र होते. अनुपम मिश्र हे गांधी शांति प्रतिष्ठानचे काम पाहतात, याची तोवर कल्पना नव्हती. त्यांनी पत्रात लिहिले होते, तुम्हाला पुस्तक हवे आहे, तर व्हीपीपी किंवा मनी ऑर्डर या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत. हम आपको ग्राहक नही, पाठक मानते हैपत्रातील या वाक्याने अक्षरश: थरारून गेलो. पुस्तकाच्या ग्राहकाला वाचक मानण्याची ही धारणा सगळीकडेच रुजायला हवी, असे मनोमन वाटून गेले. पुस्तकाची मागणी करणाऱ्या कुणा अनोळखी व्यक्तिविषयी एवढी आत्मियता पहिल्यांदाच अनुभवायला मिळत होती. त्यानंतर अनुपम मिश्र यांच्याशी ष्टद्धr(७०)णानुबंध जुळले. जेव्हा जेव्हा दिल्लीला जाईन तेव्हा गांधी शांति प्रतिष्ठानला भेट आणि अनुपम मिश्र यांच्याशी गप्पा हा नित्याचा परिपाठ बनला.
अतिशय लाघवी तरीही अकृत्रिण बोलणे. व्यक्तिमत्त्वातला साधेपणाही कमालीचा प्रभावीत करणारा. बोलण्यातून झिरपणारे जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्याला समृद्ध करणारे. इतक्या वेळा भेटी झाल्या, परंतु अनुपम मिश्र कधी स्वत:विषयी बोलताना आढळले नाहीत. पाणी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि त्याच विषयावर ते सतत बोलत असतात. त्यांचे बोलणेही पाण्यासारखेच, खळाळणाऱ्या झऱ्यासारखे निर्मळ आणि प्रवाही. पाण्याच्या क्षेत्रात या माणसाने एवढे प्रचंड काम केले आहे, परंतु या या गोष्टी मी केल्यातअसे चुकूनही कधी त्यांच्या बोलण्यातून येत नाही. पारंपारिक जलसाठवणुकीच्या बाबतीत ते देशातील जाणकार म्हणून ओळखले जातात. आज भी खरे है तालाबया त्यांच्या पुस्तकाचा देशातील बहुतेक सर्व भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि त्या त्या भाषांमध्ये हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. अनेक संस्थांनी खर्च करून ते पुस्तक लोकांर्पयत पोहोचवले आहे. देशाला तलावांची समृद्ध परंपरा होती आणि ही परंपराच आजच्या पाणीसमस्येवरील सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे.  मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकानंतरच देशभर प्राचीन जलस्त्रोतांचा शोध आणि पारंपारिक तलावांचा शोध तसेच पुनरुज्जीवनाचे कार्य सुरू झाले. राजस्थानात जयपूर जिल्ह्यातील लापोडिया गावातल्या ग्रामस्थांनी या पुस्तकालाच धर्मग्रंथ मानून जलस्त्रोतांचा शोध घेतला. सामूहिक प्रयत्नातून दुष्काळग्रस्त गावाचा कायापालट घडवून आणला. तीनशे लोकवस्तीचे हे गाव दरवर्षी दुधापासून चाळीस लाखांचे उत्पन्न घेते. यातूनच गावाला लक्ष्मणसिंह यांच्यासारखा ग्रामविकासाचा नायक मिळाला. लापोडिया गावापासून प्रेरणा घेऊन आजुबाजूची सुमारे तीनशे गावे स्वयंपूर्ण बनली. या परिसरातून रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतरही खूप कमी झाले. ख्यातनाम जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद करून घेतला आहे. भारत ज्ञान विज्ञान परिषदेने या पुस्तकाच्या  हजार प्रती छापून मोफत वाटप केले. मध्य प्रदेशच्या जनसंपर्क विभागाने  हजार प्रती छापून प्रत्येक ग्रामपंचायतीर्पयत पोहोचवल्या. कपार्टच्या सुहासिनी मुळे यांनी या पुस्तकावर वीस मिनिटांची फिल्म बनवली असून ही फिल्म दूरदर्शनवर अनेकदा दाखवण्यात आली आहे. देशभरातील सोळा रेडिओ स्टेशन्सनी पुस्तकाचे क्रमश: वाचन प्रसारित केले.
देशभरातील पर्यावरणाशी संबंधित संस्था आणि चळवळींशी संबंधित असलेला हा माणूस नेहमी पडद्यामागे राहात आला. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या नवीदिल्लीस्थित संस्थेच्या स्थापनेमध्ये अनिल अग्रवाल यांच्याबरोबर अनुपम मिश्र यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता, हे खूप कमी लोकांना ज्ञात आहे. पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजें्र सिंह यांच्या अलवरमधील कामाचे खूप कौतुक झाले. त्यासाठी त्यांना मॅगेसेसे पुरस्कारही मिळाला. परंतु या कामामध्ये लोकसहभागाची जोड देण्याची कल्पना अनुपम मिश्र यांची होती. राजें्र सिंह यांच्या तरुण भारत संघाचे ते अनेक वर्षे अध्यक्षही होते. प्रारंभीच्या काळात राजें्र सिंह यांच्याबरोबर अनुपम मिश्र आणि सीएसईचे संस्थापक अनिल अग्रवाल यांनीही काम केले. राजें्र सिंह यांच्या कामाला वैचारिक अधिष्ठान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका या दोघांनी बजावली. राजें्र सिंह यांनी लोकांमध्ये मिसळून प्रचंड काम केले आणि देशासमोर अलवरला देशासमोरचे एक आदर्श उदाहरण बनवले. अलवरचे काम मार्गी लागल्यानंतर अनुपम मिश्र यांनी तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानमध्ये जिथे जिथे पाण्यासाठी काम सुरू होते तिथे तिथे जाऊन मदतीचा हात दिला. याच कामासाठी ते देशाच्या कानाकोपऱ्यांर्पयत पोहोचले. गांधी शांति प्रतिष्ठानच्या वतीने गांधीमार्गनावाचे उत्तम दर्जाचे हिंदी द्वैमासिक प्रकाशित केले जाते, त्याचे संपादन अनुपम मिश्र करतात.
एका लेखात त्यांनी म्हटले आहे, ‘लिहिण्या-वाचण्याशी संबंधित बाबी औपचारिक असतात. शाळेच्या वर्गात बसून सगळे येत नाही. एवढय़ा मोठय़ा समाजाचे संचालन करण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी काही वेगळे मार्ग अनुसरण्याची गरज आहे. काही गोष्टी रात्री आईच्या कुशीत शिरुन झोपी जाता जाता समजायला लागतात तर काही गोष्टी काका, आजोबांच्या खांद्यावर बसून चालता चालता लक्षात येतात. जगण्याचे शिक्षण अशा अनेक मार्गानी परिपूर्ण होत असते.
 आजच्या काळात खराखुरा गांधीविचारांचा पाईक पाहायचा असेल तर अनुपम मिश्र यांना भेटायला हवे !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर