अजित पवार की सुप्रिया सुळे?

अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची निवड ही शरद पवार यांच्या मनाविरुद्ध आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद ठेवण्याची शरद पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ असून पवार कुटुंबातील कलह त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा केली जात आहे. काही वृत्तवाहिन्या आणि मु्िरत माध्यमांनी या कलहाचे सूचन केले आहे. राजकारणापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे असे वारंवार सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचा दाखला समोर असल्यामुळे पवार कुटुंबातही तसेच घडणार असे अनेक राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत आहेत. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार किंवा शिवसेनेबरोबर युती करणार असे गेल्या अनेक वर्षापासून खास सूत्रांचा हवाला देत सांगितले जाते. त्यासंदर्भातील गुप्त बैठका कुठे कुठे झाल्या आणि फॉम्र्यूला काय ठरला, यासंदर्भातील एक्स्क्ल्यूजिव्ह बातम्या यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्यापर्पयत तसे काहीच घडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही अधूनमधून कें्रातील आघाडीचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अशा पंडितांना उमेद येते, आणि तिसऱ्या आघाडीची मोट बांधून शरद पवार पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या फुटायला लागतात. ओरिसाच्या नवीन पटनायकांपासून आंध्रातल्या वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यार्पयतचे संदर्भ त्यासाठी जोडले जातात. परंतु तसेही काही घडत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदामुळे संबंधितांना पुन्हा एक मुद्दा मिळाला आहे.
शरद पवार यांची माया पुतण्यापेक्षा मुलीवर असणे स्वाभाविक आहे, परंतु चार दशकांहून अधिक काळ राजकारणात तेही लोकांशी थेट संपर्कात राहणाऱ्या शरद पवार यांना लोकमानस कळत नसेल, असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. अजित पवार दोन दशके राजकारणात आहेत आणि सुप्रिया सुळे यांना अवघी चार वर्षे झाली आहेत. पहिल्यांदा त्या राज्यसभेवर गेल्या. गेल्यावर्षी लोकसभेची निवडणूक लढवून खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाडय़ात उतरल्या. शरद पवार यांनी त्यांना एकदम राजकारणात आणलेले नाही. महाराष्ट्राचे विशेषत: तळागाळातल्या घटकांचे प्रश्न त्यांनी समजून घ्यावेत यासाठी राजकारणाआधी त्यांना समाजकार्याचे धडे दिले. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने यांच्याबरोबर भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या काही वर्षे कार्यरत होत्या. जेणेकरून गावकुसाबाहेरच्या गरिबातल्या गरीब माणसांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी. बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून महिलांशी संबंधित क्षेत्रात सक्रीय आहेत. जोडीने शिक्षण क्षेत्र आहेच. काही प्रमाणात सामाजिक धडे गिरवायला लावूनच शरद पवारांनी आपल्या लेकीला राजकारणात आणले आहे. चार वर्षापासून त्या खासदार आहेत, परंतु त्यांच्या आतार्पयतच्या वाटचालीवरून काय दिसते? खरेतर शरद पवारांची मुलगी म्हणून जी संवेदनशीलता आणि झपाटा दिसायला हवा होता, तो त्यांच्या कामातून आतार्पयत तरी दिसला नाही. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून आदिवासी भागातील बालमृत्यूर्पयत अनेक प्रश्न तीव्रतेने समोर आले. त्याठिकाणी त्या कुठेच दिसल्या नाहीत. मुंबईत आंदोलन करुन रुग्णांना वेठीला धरणाऱ्या डॉक्टरांच्या एका आंदोलनात डॉक्टरांच्या बाजूने मध्यस्थीसाठी त्या पुढे आल्याचे दिसले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर यासारख्या संस्थांशी संबंधित असण्यात काही गैर नाही, परंतु त्यापेक्षा तळागाळातील लोकांच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करणे कधीही चांगले. लोकसभेवर निवडून आल्यानंतर बारामती मतदार संघाशी त्यांनी ठेवलेला संपर्क, लोकांची कामे करून देण्याचा झपाटा हे सगळे मतदारसंघाच्या बांधणीसाठी पूरक ठरणारे आहे. कारण त्यांना माहीत आहे, की शरद पवार यांची लेक किंवा बारामतीची माहेरवाशीण म्हणून यावेळी लोकांनी कौतुकाने निवडून दिले. हे कौतुक फारतर आणखी एका निवडणुकीर्पयत टिकेल. त्यानंतर टिकायचे असेल तर त्यांना स्वत: आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध करावे लागेल. अजित पवार यांनी ते सिद्ध केले आहे. आणि ते त्यांनी केले नसते तर शरद पवारांच्या या पुतण्याला बारामतीच्या लोकांनी कधीच फेकून दिले असते. बारामतीच्या लोकांशी जोडून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, मात्र शरद पवार यांच्या लेकीकडून एवढय़ा माफक अपेक्षा नाहीत. हे म्हणजे सुनील गावसकरनंतर रोहनच्या कारकीर्दीसारखे आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणारा घराणेशाहीचा पुरस्कर्ता असलेला मोठा गट आहे. त्यामागील भाबडेपणा आणि लाचारी लपून राहणारी नाही, परंतु सुप्रिया सुळे यांना त्यादृष्टिने वाटचाल करायची असेल तर खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. बारामतीचा पाया मजबूत करण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करावे लागेल. बारामतीच्या पलीकडे विदर्भापासून कोकणार्पयत आणि मुंबईपासून खानदेशार्पयत महाराष्ट्र उभा-आडवा-तिडवा पसरला आहे. प्रदेशनिहाय तळागाळातल्या लोकांचे शेकडो प्रश्न आहेत. सामाजिक सांस्कृतिक आकलन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रश्न समजून घेत लोकांशी जोडून घेऊन काम सुरू केले तरच नेतृत्व प्रस्थापित करता येईल. मात्र त्यांची सध्याची कार्यपद्धती एनजीओसारखी आहे. त्यातून तात्कालीक प्रसिद्धी मिळेल, परंतु दीर्घकालीन काहीच साध्य होणार नाही.
नेतृत्व लादून चालत नाही, तर ते लोकांनी स्वीकारावे लागते. अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत, ही त्यांची दोन दशकांच्या वाटचालीची कमाई आहे. सुरुवातीच्या काळात केवळ उद्धट आणि उर्मट अशी प्रतिमा असलेल्या अजित पवार यांनी नंतरच्या काळात कार्यशैलीमध्ये खूप बदल केले आहेत. आक्रमकपणा कायम राहिला आहे, आणि ते त्यांचे बलस्थानही ठरले आहे. शरद पवार यांची दिल्लीच्या राजकारणातील व्यस्तता वाढल्यानंतर राज्यातील पक्षीय प्रश्नांमध्ये निर्णायक निकाल देणारे कुणी नव्हते. म्हणजे एकाच लेव्हलचे दहा-बारा नेते असल्यामुळे कुणी कुणाला जुमानत नव्हते. परंतु अलीकडच्या काही वर्षात अजित पवार यांनी सर्वाना धाकात ठेवले आहे. त्याला कुणी दादागिरी म्हणत असले तरी पक्षशिस्तीसाठी असा धाक आवश्यक असतो. अजित पवार यांनी आपल्या कार्यशैलीतून नेतृत्व स्वत:कडे खेचून घेतले आहे. शरद पवार यांनी ते नाकारायचे म्हटले असते तरी ते शक्य नव्हते. असे असले तरी नेतृत्व निभावणे तितकेसे सोपे नाही. याआधी आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा छगन भुजबळ यांच्यावर व्यक्तिश: नेतृत्वाचे ओझे नव्हते. किंवा नेतृत्वाच्या अनुषंगाने त्यांचे मूल्यमापन होणार नव्हते. जी काही बेरीज-वजाबाकी असेल त्याची पावती शरद पवार यांच्या नावावर फाटत होती. यापुढे मात्र महाराष्ट्रात तरी पक्षाचे जे काही होईल, त्या श्रेय-अपश्रेयाची जबाबदारी अजित पवारांना घ्यावी लागेल. व्यक्तिगत चारित्र्यापासून सार्वजनिक व्यवहारांर्पयत साऱ्या कसोटय़ांवर उतरले तरच नेतृत्व प्रस्थापित होऊ शकेल.
सुप्रिया सुळे यांना राजकारणात रुळायला आणि महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यायला अजून बराचसा वेळ द्यावा लागेल. तोर्पयत त्यांना अजित पवार यांचे नेतृत्व मानूनच काम करावे लागेल. स्वत:चे नेतृत्व उभे करताना एखाद्याचे नेतृत्व मानून काम करणे अवघड असते. हा तोल कसा सांभाळला जातोय त्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका ‘सुपारी’ची डायरी

दादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद

मृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’